नवी मुंबई मध्ये गुंतवणूक का !!!
नवी मुंबई हे एक नियोजनबद्ध आणि जलद वेगाने विकसित होणारे शहर आहे. नवी मुंबई व त्याअंतर्गत विविध नोड मधील पायाभूत सुविधा व औद्योगिक विकास करण्यासाठी १७ मार्च १९७० रोजी सिडकोची स्थापना करण्यात आली.
नवी मुंबई शहर हे ऐरोलीपासून पनवेलपर्यंत आणि पनवेलपासून उरणपर्यंत विस्तारलेले आहे. नवी मुंबईमधील वेगाने होणारा विकास, येथील कनेक्टिव्हिटी – मुंबई आणि नवी मुंबई ह्यांना जोडणारे रेल्वे मार्ग, हार्बर लाईन, ट्रान्स-हार्बर लाईन, पनवेल ते रोहा मार्ग तसेच रोड कनेक्टिव्हिटीमध्ये सायन-पनवेल महामार्ग, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, पनवेल-उरण रोड व जे.एन.पी.टी. कनेक्शन यामुळे नवी मुंबई हे सर्व शहरांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण बनले आहे. येथील आधुनिक सोयीसुविधा, विकासाची संधी, चांगल्या दर्जाचे शिक्षण देणाऱ्या शाळा – कॉलेज इत्यादींमुळे नवी मुंबईमध्ये घर घेण्याचे अनेक फायदे आहेत. सिडकोच्या नवनवीन सुधारणा, औद्योगिकीकरणावर भर, नागरिकांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना ह्यामुळे गेल्या ५५ वर्षांपासून नवी मुंबईचा विस्तार झपाट्याने होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई मेट्रो , अटल सेतू हे काही मुख्य प्रकल्प , तसेच मेट्रो लाइन 8, ‘गोल्ड लाइन’, विरार अलिबाग कॉरिडॉर, कल्याण – तळोजा मेट्रो यांसारखे प्रकल्प प्रस्तावित आहेत.
नवी मुंबई तसेच विस्तारित होणारी तिसरी मुंबई आणि नवनवीन प्रकल्प ह्यामुळे अनेक सुखसोयी बरोबर रोजगारासाठी देखील येथे नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. नवी मुंबई हे सध्या परवडणाऱ्या घरांसाठी, सुव्यवस्थित जीवनशैलीसाठी आणि उत्तम भविष्याच्या दृष्टीने एक प्रमुख ठिकाण ठरले आहे. सरकारच्या विविध गृहनिर्माण योजनांमुळे सामान्य नागरिकांसाठी इथे घर घेणं आता अधिक सुलभ झालं आहे. अशा विकसनशील शहरात चांगल्या दर्जाचे जीवन अनुभव आपण घेऊ शकता. परवडणाऱ्या दरात घर घेण्यासाठी सिडकोच्या उपलब्ध असलेल्या विविध योजनांचा आपण नक्कीच लाभ घेतला पाहिजे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील मुंबई शहराजवळचा प्रस्तावित विमानतळ आहे. हे विमानतळ महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील उलवे येथे बांधले जाणारे एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. पूर्ण झाल्यावर, ते मुंबई महानगर प्रदेशातील दुसरे विमानतळ बनेल, जे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत सेवा देईल.
हे विमानतळ शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) द्वारे तयार केलेले ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. विमानतळ पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. येथील आसपासच्या परिसरातील उदद्योगांना देखील चालना मिळेल. ह्या विमानतळामुळे आसपासच्या क्षेत्रांत गुंतवणूकीची शक्यता वाढेल.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील मुंबई शहराजवळचा प्रस्तावित विमानतळ आहे. हे विमानतळ महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील उलवे येथे बांधले जाणारे एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. पूर्ण झाल्यावर, ते मुंबई महानगर प्रदेशातील दुसरे विमानतळ बनेल, जे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत सेवा देईल. हे विमानतळ शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) द्वारे तयार केलेले ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. विमानतळ पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. येथील आसपासच्या परिसरातील उदद्योगांना देखील चालना मिळेल. ह्या विमानतळामुळे आसपासच्या क्षेत्रांत गुंतवणूकीची शक्यता वाढेल.
मेट्रो लाईन १ - बेलापूर ते पेणधर (तळोजा)
बेलापूर आणि पेणधर दरम्यान चालणारी ही मेट्रो लाईन १, १७ नोव्हेंबर २०२३ रोजी पासून सुरू झाली. ही लाईन शहराच्या सार्वजनिक वाहतूक नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग आहे, सीबीडी बेलापूर ते तळोजा औद्योगिक क्षेत्र आणि सिडको गृहसंकुलांसह विविध क्षेत्रांना ही मार्गिका अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करते. सीबीडी बेलापूर येथील हार्बर लाईनशी देखील जोडली जाते, ज्यामुळे पुढील वाहतुकीचे पर्याय देखील उपलब्ध होतात. या मार्गात बेलापूर टर्मिनस, बेलपाडा, उत्सव चौक, पेठपाडा, पेणधर अशा प्रमुख स्थानकांचा समावेश आहे आणि तो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत वाढवण्याची प्रस्तावित योजना आहे.
अटल सेतू
अटल सेतू, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ( MTHL) हा भारतातील सर्वात लांब समुद्री पूल आहे. याची एकूण लांबी सुमारे 21.8 किलोमीटर आहे. हा पूल शिवडी पासून सुरू होऊन नवी मुंबईतील चिरले येथे समाप्त होतो. या पुलामुळे मुंबई आणि नवी मुंबई यांच्यातील अंतर कमी झाले आहे. अटल सेतू वरून नवी मुंबई विमानतळ हे अवघ्या ३०-४० कि. मी. च्या अंतरावर आहे.
विरार अलिबाग कॉरिडॉर
विरार-अलीबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तावित केलेला एक महत्वाकांक्षी वाहतूक प्रकल्प आहे. हा कॉरिडॉर मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारा 126 किलोमीटर लांबीचा एक्सप्रेसवे असेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ , मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि मालवाहतूक कॉरिडॉर यासह प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांशी हा कॉरीडॉर जोडला जाईल ज्यामुळे व्यापार आणि उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होऊ शकतो.
पनवेल - बदलापूर कनेक्टिविटी
बडोदा ते JNPT या महामार्गावरील माथेरानजवळच्या बोगद्यामुळे बदलापूर ते पनवेल असा अंदाजे चार किलोमीटर अंतराचा बोगदा हा राज्यातील सर्वात जास्त लांबीचा भुयारी मार्ग ठरणार आहे. या बोगद्यामुळे बदलापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या 10 मिनिटांमध्ये करणे शक्य होईल. तर बदलापूर-पनवेल थेट जोडले गेल्याने अटल सेतूमार्गे जवळपास 35-40 मिनिटांत मुंबई गाठणे शक्य होईल.
मेट्रो लाइन 8, 'गोल्ड लाइन'
मुंबईतील मेट्रो लाइन 8, जी 'गोल्ड लाइन' म्हणूनही ओळखली जाते, ही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSIA) आणि प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) यांना जोडण्यासाठी आहे. हा मार्ग मुंबईतील सांताक्रूझ विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांच्यातील प्रवासाची सोय वाढवेल.
पनवेल-कर्जत रेल्वे मार्ग
कर्जतवरून मुंबईला रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी प्रस्तावित पनवेल-कर्जत हा रेल्वे मार्ग तयार होत आहे. हा 29.6 किमी लांबीचा लोकल मार्ग असून त्यावर एकूण पाच स्थानके बांधली जाणार आहेत. यामध्ये पनवेल, चिखले, मोहोपे, चौक आणि कर्जत ही स्थानके समाविष्ट आहेत. भविष्यात पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
कल्याण - तळोजा मेट्रो
मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांसाठी लवकरच प्रस्तावित कल्याण - तळोजा मेट्रो लाईन- १२ (ऑरेंज लाईन) सेवेत येणार आहे. ह्या मार्गाचा विस्तार अंदाजे 22.17 किलोमीटरचा असेल. हा मार्ग पूर्ण झाल्यावर प्रवाशांना नवी मुंबई तळोजा येथे कल्याण मधून सुमारे 45 मिनिटांमध्ये पोहोचण्याची संधी मिळेल. मेट्रो लाईन १२ ही अनेक सिडको आणि एमआयडीसी जिल्ह्यांमध्ये मार्गक्रमण करेल. या मेट्रो लाईन मध्ये एकूण 19 स्टेशन आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने कल्याण एपीएमसी, गणेशनगर-कल्याण, डोंबिवली, ते पिसर्वे, पिसर्वे डेपो आणि अमानदूत (तळोजा) अशा स्थानकांचा समावेश असेल. हा मार्ग कल्याण पासून सुरु होऊन तळोजा इथं पर्यंत असेल.
नवी मुंबई एज्युसिटी
महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडकोमार्फत नवी मुंबईत प्रस्तावित एज्युसिटी अंतर्गत जागतिक विद्यापीठांचे कॅम्पस उभारण्यात येणार आहे. एज्युसिटीमध्ये त्यांचे कॅम्पस स्थापन करण्यासाठी पाच परदेशी विद्यापीठांना नुकतेच लेटर ऑफ इंटेंट (LOI) देण्यात आले. मुंबई महानगर प्रदेशात (MMR) भारतीय विद्यार्थ्यांना आता जागतिक दर्जाचे जागतिक शिक्षण उपलब्ध होईल.